PIK VIMA 2024 गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यांना आता त्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील ४५,०१० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ४१.६२ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
ही रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीकडून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील मोहळा, कळंब, पाडोळी, धाराशिव, सलगरा, सावरगाव, तुळजापूर, आनळा आणि सोनारी या नऊ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.
मित्रांनो गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना असं लागली आहे की लवकरच नुकसान भरपाई मिळावी. त्यामुळे शासनाने त्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत केलेल्या विम्याच्या रकमेपेक्षा अधिक नुकसान झाल्याने शासनाने देखील नुकसानभरपाईची रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. ही नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेटपणे जमा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळेल आणि त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होईल.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे नष्ट झाली होती. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. काहींनी तर सर्वस्वीच नुकसान सोसावे लागले होते. अशा परिस्थितीत नुकसानभरपाईची रक्कम मिळणे हे शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावरील आर्थिक ताण वाढला होता.
नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. गेल्या वर्षी नुकसान भरपाई झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण होता तसेच हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली तर शेतकऱ्यांचा ताण कमी होईल व मागच्या वर्षी काढलेल्या कर्जाची परतफेड करू शकतील
त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. तर काहींना घरखर्च भागविण्यास मदत होईल. अशाप्रकारे ही नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचेच फळ आपण खातो. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. अशा वेळी शासनाने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला ही स्तुत्य बाब आहे. PIK VIMA 2024