Electricity Bill | अर्रर्र…! वीज दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार; लगेच पाहा किती रुपये युनिटने वीज मिळणार । Electricity Bill

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Electricity Bill शेतकऱ्यांवर वीज दरवाढीचा डोंगर कोसळवला आहे. या दरवाढीमुळे आधीच संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा धक्का बसला आहे. वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली असून दुसऱ्या टप्प्यातील वाढ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे वीज दरात ६ ते १२ टक्के वाढ होणार असून स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे.

कृषी पंपांसाठी वीज दरात लक्षणीय वाढ झाली आहे. लघु दाब शेती पंपासाठी वीज दर २०२२-२३ मध्ये ३.३० रुपये प्रति युनिट होता, तो २०२४-२५ मध्ये ४.५६ रुपये प्रति युनिट झाला आहे. याशिवाय स्थिर आकाराचा बोजाही वाढला आहे.

लघुदाब शेती पंपासाठी स्थिर आकार २०२२-२३ मध्ये ४३ रुपये प्रति अश्वशक्ती होता, तो २०२४-२५ मध्ये ५२ रुपये प्रति अश्वशक्ती झाला आहे. उच्च दाब शेती पंपासाठी स्थिर आकार २०२२-२३ मध्ये ८० रुपये प्रति केव्हीए होता, तो २०२४-२५ मध्ये ९७ रुपये प्रति केव्हीए झाला आहे.

हे पण वाचा:
Check the loan waiver अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर पहा एका क्लिक वरती आपले नाव Check the loan waiver

एकंदरीत लघुदाब शेती पंपासाठी २० टक्के तर उच्च दाब शेती पंपासाठी २१ टक्के दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढणार असून शेती उत्पादनावरही परिणाम होईल. यामुळे अन्नधान्याच्या किमतीही वाढतील आणि महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसेल.

शेतकरी आंदोलकांनी या वीज दरवाढीचा निषेध करताना शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांसाठी वीज दरात सवलत देण्याची, महावितरणची कार्यक्षमता वाढवून वीज गळती कमी करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, वीज दरवाढीचा निर्णय वीज नियामक आयोगाने घेतलेला असला तरी शासनाकडूनच वीज महामंडळांना नियमित अनुदान दिले जाते. त्यामुळे वीज दरवाढ रद्द करण्याचाही पर्याय शासनाकडे उपलब्ध आहे. पण शासनाला आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांची सोय करावी लागेल. Electricity Bill

हे पण वाचा:
Namo Shetkari and PM Kisan Yojana शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे ४००० रुपये यादीत पहा आपले नाव Namo Shetkari and PM Kisan Yojana

अनेक शेतकरी कुटुंबे आधीच गरीबी आणि कर्जबाजारीपणामुळे दडपण झालेले आहेत. अशा परिस्थितीत वीज दरवाढीमुळे त्यांची अडचण आणखी वाढणार आहे. शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतर करू लागला तर त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर होईल. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment