monsoon will enter बंगालच्या उपसागरात घोंघावणारा ‘रेमल’ चक्रीवादळ आता अधिक तीव्र होत आहे. या वादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान झाला असून यामुळे पाऊसपेरा लवकरच सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चक्रीवादळ अधिक तीव्र होत आहे
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ‘रेमल’ चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र स्वरूपात येईल. मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हे वादळ कोसळणार आहे. यासाठी कोलकाता विमानतळावरून २१ तासांसाठी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच डझनभर मेल गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
मान्सूनचा मार्ग वेगवान
बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान झाला आहे. मान्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मजल मारली असून या वादळामुळे मान्सूनची गती अधिक वाढली आहे. वादळ शमल्यानंतर मान्सूनची पुढील दिशा निश्चित होणार असल्याचे हवामान विभागाचे मत आहे.
केरळमधील आगमन लवकर होणार
यामुळे शुक्रवार दि. ३१ मे रोजी मान्सूनचे केरळमधील आगमन लवकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी मान्सूनचे केरळमधील आगमन लवकर होणार आहे.
कोकण व महाराष्ट्रातील आगमन
३१ मे दरम्यान केरळात, तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे. तसेच, १५ जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात मान्सूनचे आगमन होऊ शकते.
बंगाल शाखेची सक्रियता कोणत्या भागात अधिक?
हवामान खात्याने सांगितल्यानुसार, मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते. तसे झाले तर सांगली, सोलापूर, धारा शिव, लातूर, नांदेड, परभणी आणि त्यांच्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तिथे लवकर होऊ शकते.
उष्णतेचा उकाडा जाणवणार
महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबरच रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
सावधगिरी बाळगणे
‘रेमल’ चक्रीवादळामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना फटका बसणार असल्याने आठ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सर्व आपात्कालिन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेनेही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.